मराठी भाषेसमोरील आव्हानांना तिलाजंली देण्याचा महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक शाळा,महाविद्यालयात १ जाने.ते १५ जाने हा कालावधी म मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म म्हणून  साजरा करण्यात यावा असे शासनाने परिपत्रकाद्वारे आदेशित केले आहे.त्यानुसार मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी म मराठी भाषा संवर्धन पंधरवडाफ साजरा करण्यात येतो.हा पंधरवडा साजरा करण्यामागचा शासनाचा असा हेतू आहे की, महाराष्ट्रातील अमराठी भाषिकांमध्ये मराठीचा प्रसार आणि प्रचार करणे,मराठी भाषेसंदर्भात तज्ज्ञ मंडळीच्या कार्यशाळा, शिबिर आयोजित करणे, वक्तृत्व, लेखन स्पर्धांचे आयोजन करणे,  मराठी भाषेचे परिसंवाद, कार्यशाळांचे आयोजन करणे, राज्यस्तरीय वक्तृत्व, निबंध स्पर्धांचे आयोजन करणे, याशिवाय मराठी वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी मराठीतील मौलिक ग्रंथांचा परिचय करून देणे, तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करणे, कथाकथन, काव्यवाचन याविषयी कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन करणे, मराठी भाषेचा इतिहास आणि  मराठीच्या विविध बोली यांचा परिचय करून देणे, मराठी माध्यमाच्या शाळेचे पटवून देणे, मराठी भाषेसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी  लोकांना एकत्र आणणे अशा या दैदीप्यमान इतिहास असलेल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक मराठी भाषिकांनी पुढाकार घ्यावा हा शासनाचा ममराठी भाषा संवर्धन पंधरवडाफघेण्यामागे उदात्त हेतू आहे.या पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी भाषिकांनी  दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करून दुसर्‍यांनाही मराठी वापरासंदर्भात प्रोत्साहित करून  मराठी माध्यमाच्या शाळा,मराठी साहित्य,संगीत ,चित्रपट यांचा  जागतिक स्तरावर  प्रचार आणि प्रसार करून अशा संकल्पकातून केले पाहिजे.
                असे असले तरी ङ्गअमृतातेही पैजाफ जिंकणार्‍या माय मराठीची महाराष्ट्रात मातृभाषा म्हणून दर्जा असतानाही नेहमी उपेक्षाच होताना दिसते आहे. जागतिकीकरण, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावी रेट्यामुळे मराठी भाषेचे महत्व कमी होत चालले आहे. भाषावार प्रांतरचनेच्या मागे मराठीचा विकास करणे हा उद्देश असला तरीही मराठी भाषेचा म्हणावा तितका अजूनही विकास झालेला दिसत नाही. मराठी ही सार्वजनिक व्यवहाराची, व्यवसायाची भाषा राहिली नाही, ती राजभाषा बनू शकली नाही. आज मराठी भाषेवर इंग्रजी, संस्कृत, कन्नड, हिंदी, जर्मन, पोर्तुगीज, अरबी, फारशी अशा अनेक भाषांचे आक्रमण होत आहे, या भाषेतील अनेक शब्दांचा शिरकाव मराठी भाषेत झाले आहे. त्यामुळे मराठी भाषेत खुप परिवर्तन झाले आहे. कन्नड  तेलगू  तमिळ भाषांनी जशी आपल्यातील शुध्दता जपून ठेवली, तशी मराठी भाषेनी आपली शुध्दता जपून ठेवल्याचे दिसत नाही. म्हणून मराठी भाषिकांनी मराठी भाषेचा हट्ट मनाशी बाळगला पाहिजे; पण तसे महाराष्ट्रात दिसत नाही. महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या प्रदेशातील भाषेचा प्रभावही जोमाने होत आहे. 
 आज ङ्गमराठीफ  विषयाचे प्रेम कमी होत चालले आहे. इंग्रजी भाषेला अवास्तव महत्व मराठी भाषिकांनी दिले आहे. इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणामुळे आपल्या पाल्यांना इग्रंजी माध्यमाच्या शाळेत घातले जात आहे. मराठी माणसेच आज न्यूनगंडाने पछाडल्यासारखी आपल्या जीवनव्यवहारात मराठीला दुय्यम स्थान देऊ लागली आहेत. ज्यांनी अत्यंत ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून मोठे यश संपादन केले आणि मोठी पदे मिळविली तिच माणसं मुलांना मात्र इंग्रजी माध्यमातून शिक्षण देत आहेत. याशिवाय राजकीय नेतृत्वाची मराठी भाषेसंदर्भात उदासीनता दिसून येत आहे. वाचन संस्कृतीची हेळसांड होते आहे बदलत्या व्यापारी धोरणांचा परिणाम मराठी भाषेवर होत आहे. चंगळवादी साहित्य निर्मितीमुळे मराठी भाषिकांत अनास्था दिसते आहे. मराठी भाषा प्रभुत्वाचा अभाव मराठी भाषिकांत आजही आहे. परदेशी विद्यापीठाच्या स्थापनेला महाराष्ट्रात चालना मिळत आहे. परप्रांतियांचे आगमन मुंबई, पुणे यासारख्या शहरात होत आहे. मराठी मुलख असतानाही काही जणांना मराठी भाषेत बोलणे ओंघळवाणे वाटत आहे. मराठी भाषिक असतानाही मराठी भाषिक माणसांच्या मनात मराठी भाषेविषयी अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. आज दर्जेदार साहित्य निर्मिती म्हणावी तशी होताना दिसत नाही. याशिवाय महाराष्ट्रात मराठी या ऐच्छिक विषयाला पाली, हिंदी, इंग्रजी, रशियन, जर्मन, संस्कृत असे पर्यायी विषय आहेत. अभ्यासक्रमात मराठी भाषेच्या अध्यापन व अध्ययनाविषयी अनास्था दिसून येत आहे. पालक व विद्यार्थ्याची मराठी भाषेसंदर्भात मानसिकता बदलू लागली आहे. शासनदरबारी मराठी भाषेची म्हणावी तशी दखल घेतली जाताना दिसत नाही. साहित्य संमेलनात अलीकडे मराठी भाषेचा जागर सोडून इतर गोष्टीवर वाद होत आहेत. निपक्षपातीपणे साहित्यिकांना प्रोत्साहन दिले जात नाही. अनेक साहित्यिक वादाच्या भोवर्‍यात आणि आर्थिक विवंचनेत अडकले आहेत. तसेच आपल्याकडे आजही मराठी भाषेचा हास होत आहे असे भाष्य केले जाते; परंतु मराठीच्या काळ्याकुट्ट भविष्याबाबत सहसा कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. आज महाराष्ट्रात सेट, नेट, एम. फिल., पीएच. डी. यासारख्या मोठ्या पदव्या मराठी भाषेत मिळवूनसुध्दा नोकर्‍या लागत नाहीत. अनेक मराठी भाषिक बेकार तरूणाईची फौज निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मराठी भाषिक शाळा हद्दपार होत चालल्या आहेत. बोटावर माजण्या इतकी मुले मराठी भाषिक शाळेत दिसत आहेत. म्हणूनच महाराष्ट्रात आज अनेक बोलीभाषा शेवटच्या घटका मोजत आहेत. तीच त-हा आता मराठी भाषेचीही होत आहे. अशा या मराठी भाषेसंदर्भात मराठी भाषिकांनी चिंतन, मनन करणे ही काळाची गरज आहे, त्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या पाहिजेत. 
 मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि शासनदरबारी तिची योग्य दखल घेतली पाहिजे म्हणूनच मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. परंतु या प्रयत्नाला अजूनही यश आलेले दिसत नाही. त्यामुळे अशा पडत्या काळात मराठी भाषिक माणसांनी मराठीचे संवर्धन व मराठी भाषाभिवृध्दीसाठी पुस्तक प्रकाशन व नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. कामकाजाची व ज्ञानभाषा म्हणून मराठीचा वापर केला पाहिजे. बँकक्षेत्र, कृषी, न्याय, संगणक, रेल्वे, शिक्षण, पोस्ट अशा सर्वांगीण क्षेत्रात, प्रशासकीय व्यवहारात मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. पालक व विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच प्रवेश घेण्याचे खूळ बाजूला ठेवले पाहिजे. जन्मभूमी, मातृभाषा मराठीबद्दलची अस्मिता मराठी माणसांनी वृध्दिंगत केली पाहिजे. प्रसारमाध्यमांनीही मराठी भाषेचा जागर तेवत ठेवला पाहिजे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, फादर स्टिफन्स, सुरेश भट्ट आदि संत, अभ्यासकांनी मायबोली मराठी भाषेचा गोडवा गायीला, तोच वारसा आजच्याही पिढीने पुढे घेऊन गेला पाहिजे. इंग्रजी ही ज्ञानार्जन व जागाशी संवाद साधण्याची भाषा असली तरी मराठी भाषिकांनी तिच्या नादात मातृभाषा मराठीला विसरता कामा नये. मराठी भाषेत ज्ञानाचे भांडार अवाढव्य आहे. कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र  आत्मचरित्र, लघुनिबंध, प्रवासवर्णन अशा सर्वच वाड्:मय प्रकारात नवोदित पिढीतील लेखकांनी सृजनशील साहित्यनिर्मिती केली पाहिजे. अलीकडे शासनाने पुस्तकाचे गाव ङ्गभिलारफ ला नावारूपास आणून मराठी भाषेची चळवळ वृध्दिंगत करून मराठी भाषेला चालना दिली आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेसंदर्भात सक्षम चळवळी उभ्या केल्या पाहिजेत. साहित्य संमेलनातील वाद बाजूला ठेऊन मराठीचा जागर केला पाहिजे. लेखक, साहित्यिक आणि रसिकांनी आपापली कर्तव्य पार पाडून शासनदरबारी मराठी भाषेला सन्मान मिळवून दिला पाहिजे. मराठी साहित्य परिषद, वाड्:मयसंस्था आणि संघटनांनी आपली भूमिका चोख पाळली पाहिजे. सर्व विद्याशाखातील सर्व विषयात सर्व स्तरावर मराठी माध्यमातून शिक्षण देणारे व संशोधन करणारे एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे. इतरधर्मिय साहित्यिक व महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिकांनीही मराठी भाषा सातासमुद्रापलीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मराठी भाषाभिवृध्दीसाठी वेगवेगळे ग्रंथ, कोशनिर्मिती करून त्याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. चांगल्या ग्रंथाना पुरस्कार मिळाले पाहिजेत, ग्रंथ प्रकाशकांनी केवळ पैसा हा हेतू डोळ्यासमोर न ठेवता उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीला चालना दिली पाहिजे. वि. दा. सावरकर, माधवराव पटवर्धन, श्री. कृ. कोल्हटकरांची भाषाशुध्दीची चळवळ पुढे नेली पाहिजे. याशिवाय मराठी भाषाभिवृध्दीसाठी मराठी भाषेत संशोधनाला चालना, मराठी विषय सक्तीचा, मराठी भाषा वापरासंदर्भात समाजप्रबोधन, संगणकासाठी मराठी-भाषेचा वापर, मराठीचे विविध उपक्रम, मराठी भाषेसंदर्भात राष्ट्रीय चर्चासत्र, कार्यशाळा व शिबीराचे आयोजन, शासकीय कामकाजाची भाषा आणि मराठी भाषेच्या वापराविषयी कडक कायद्याची अमंलबजावणी झाली पाहिजे. ङ्गलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीफ अशी मराठी भाषेसंदर्भात सकारात्मक भावना ठेवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजूट झाले पाहिजे, तरच मराठी भाषेला साज चढेल.


डॉं.रामशेट्टी शेटकार
दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूर