लातूरात १०८ बीव्हीजीच्या रूग्णवाहिका कार्यालयास लागली आग 

सब कुछ दाल में काला;आग भडकली,जीवीत हानी नाही




 


 लातूर/प्रतिनिधी :-गोरगरिबंाना अपघात स्थळी तातडीने मदत व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाने राष्ट्रीय रूग्णवाहिका विनामुल्ये सेवा नागरिकासाठी खुली केली असून यासाठी १०८ नं डायल करा अन् तातडीने रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल होईल अशी योजना शासनाने सुरू केली असून या योजनेचा लाभ कोणाला मिळतो आणि कोणाला मिळत नाही की याचा मलिदा कत्राटदारांलाच मिळतो का? याबाबत बोलने योग्य नाही मात्र आज सकाळी या कार्यालयाला,गोडावूनला शॉटसर्किटमुळे आग लागली या आगीत कोणाची जिवीत हानी झालेली नाही.मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वेळेवर अग्निशामक दलाचे बंब पोहोचले नसते तर कदाचित मोठी घटना या ठिकाणी घडली असती कारण त्या गोडावूनमध्ये बायोडीझेलचे मोठ मोठा साठा या गोडावूनमध्ये साठवून ठेवलेला होता कदाचित यांचा स्पोट झाला असता तर अनेकांना जीव गमवावा लागला असता.अशी प्रतिक्रया आसपासच्या नागरिकांनी दै.कुलस्वामिनी संदेशला बोलताना दिली.


याबाबत अधिक माहिती अशी की,लातूर शहरातील नारायण नगर परिसरात डॉ.गुरव यांचे घर असून याच घरात डॉ.गुरव हे भारत विकास ग्रुप कंपनीचे बीव्हीजी इंडीया लिमिटेड या कंपनीचे मोठे घरातच गोडावून असून ऍम्बुलन्सला लागणार्‍या डीझेलचा साठा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला आहे.याच गोडावूनला आज सकाळच्या सुमारास आग लागल्याने मोठ मोठे आवज होत होते.परंतु घटनेचे गाभीर्य लक्षात येताच अग्नीशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्याने पुढील अनर्थ झाला असता.परंतु अग्नीशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.मात्र जिवीत हाणी नाही.

१०८ रूग्णवाहिका या योजनेचा ज्याला यांचा फायदा मिळतो तो धन्य पण ज्याला मिळत नाही त्याची मात्र फरफटत होत असते.याच सेवेचे लातूर जिल्ह्याचे कंत्राट सिताराम नगर येथील डॉ.सचिन गुरव यांच्याकडे बीव्हीजी इंडीया लि.या कंपनीने दिलेले आहे.मात्र डॉ.गुरव यांना नेमक्या शहरातील मोक्याच्या आणि रेसिडेशियल येरियात हे ऑफीस किंवा गोडावून कराता येत नाही मात्र त्यांनी मनापाची एनओसी कशी घेतली.आणि हा कारभार या येरियात कसा सुरू केला याबाबत शंका असून बीव्हीजी कंपनीचे याबाबत नियम व अटी काय आहेत याबाबात नागरिक प्रश्‍नचिन्ह निर्माण करत असून नागरिकांनी १०८ रूग्नवाहिका या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक तत्पर असतात परंतु १०८ ला डायल केल्यानंतर ही रूग्नवाहिका कधी कोणाच्या गरजेला पोहचते हे सांगणे कटीन असले तरी बीव्हीजी रूग्णवाहिका या कंपनीचे कार्यालय किंवा गोडावून रेसिडेशियल येरियात करता येत नाही मात्र याला कोणी परवानगी दिली.किंवा महापालिकेच्या कोणत्या अधिकार्‍याने एनओसी दिली माहित नाही परंतु अशा भागामध्ये अशा बीव्हीजी कंपनीचे कार्यालय किंवा गोडावून ठेेवता येत नाही, हे सत्य आहे.परंतु डॉ.गुरव यासाठी कशी एनओसी घेवून परवानगी घेतली हे देव जाणे.

दरम्याण सकाळी या बीव्हीजी कार्यालयास किंवा गोडावनास शॉटसर्किटमुळे आग लागली या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली असली तरी मोठ्या प्रमाणात नूकसान झाले असून या कार्यालयात बायोडीझेलच्या टाक्या होत्या परंतु अग्नीशामक दल घटना स्थळी आल्याले त्या टाक्याचा स्पोट झाला नाही कदाचित अग्नीशामक दलाच्या दोन गाड्या घटना स्थळी वेळेवर पोहचल्या नसत्या तर या डीझेलच्या टाक्याचा मोठा स्पोट होवून मोठी जिवीत हानी झाली असती.