दिल्लीत आपच्या झाडूने केला भाजपचा कचरा, कॉंग्रेस झाली साफ

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेचे निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. एकूण ७० मतदारसंघांपैंकी आम आदमी पक्षानं ६३ जागांवर आघाडी मिळवत राजधानीतलं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. तर भाजपनं गेल्या वेळेपेक्षा आपली कामगिरी सुधारत ७ जागांवर आघाडी मिळवलीय. २०१५ सालच्या निवडणुकीत मआपफला ६७ जागांवर यश मिळालं होतं तर भाजपला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. दुसरीकडे, २०१५ सालाप्रमाणेच यंदाही कॉंग्रेसनं आपला भोपळ्याचा विक्रम कायम राखलाय. इतर पक्षांनाही जनतेनं कोणतीही संधी दिलेली नाही.
आप उमेदवारांची कामगिरी
आपचे नवी दिल्ली मतदारसंघाचे उमेदवार अरविंद केजरीवाल, मालवीय नगरचे उमेदवार सोमनाथ भारती, कालकाजी मतदार संघातून अतिषी, ओखलामधून अमनातुल्लाह खान यांचा विजय निश्चित झालाय तर आपचे पटपडगंज मतदारसंघाचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हातीही निसटता विजय लागलाय. भाजपचे उमेदवार रविंदर सिंह नेगी यांनी सिसोदिया यांना जोरदार टक्कर दिली. परंतु, अखेरच्या टप्प्यात ३००० मतांच्या फरकानं ते मागे पडले.
अरविंद केजरीवाल यांना तिसर्‍यांदा संधी
अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेसवर असा काही झाडू चालवलाय की त्यांना सत्तेची आशाच सोडून द्यावी लागलीय. आत्तापर्यंत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या हाती आलेल्या कलांनुसार एकूण ७० जागांपैंकी ५६ जागांवर आपला आघाडी मिळालीय. झालेल्या मतदानात ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवून आपचे अरविंद केजरीवाल तिसर्‍यांदा दिल्लीचा ताज डोक्यावर चढवण्यासाठी सज्ज झालेत.
आप कार्यकर्त्यांचा जल्लोष
निकाल स्पष्ट झाल्यानंतर आप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. विजयानंतर मनीष सिसोदिया यांनीही विजयी रॅली काढली. आपच्या मुख्यालयात अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांच्यासोबत मवंदे मातरममचे नारेही दिले. यावेळी अरविंद केजरीवाल आपल्या कुटुंबासोबत दाखल झाले होते.
स्थानिक मुद्यांना जनतेनं दिलं महत्त्व
दिल्लीच्या या निकालामुळे अनेक निष्कर्ष काढता येतील. त्यापैंकी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, जनतेनं इतर मुद्द्यांपेक्षा स्थानिक मुद्यांना अधिक महत्त्व दिलंय. उल्लेखनीय म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांतही हाच पॅटर्न दिसून आला होता. आता दिल्लीच्या निकालांनी स्थानिक मुद्यांवर आणि विकास कामांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय. २०१५ सालीही आपनं ७० पैंकी तब्बल ६७ जागांवर विजय मिळवला होता. यंदाच्या प्रचारात भाजपवर टीका करण्यापेक्षा केवळ सरकारी शाळा, मोहल्ला क्लिनिक, मोफत पाणी आणि वीज या मुद्यांवर मआपफचा भर राहिला.
केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
निकाल स्पष्ट होताच विजयाचे हिरो अरविंद केजरीवाल यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. आपचा विजय निश्चित होता, मला या निकालाचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही, असं म्हणतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचं कौतुक केलं. तर मदेश जन की बात से चलेगा, मन की बात से नाही हे देशानं दाखवून दिलं. भाजपनं केजरीवाल यांना दहशतवादी म्हटलं परंतु, त्यांना पराभूत करू शकली नाहीफ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या.
भाजपच्या जागांत वाढ
दुसरीकडे, भाजपनंही आपली जागा मजबूत केल्याचं चित्रं दिसतंय. दिल्लीच्या रणांगणात भाजपनं शाहीनबागचा मुद्दा लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. त्याला फारसं यश मिळालं नसलं तरी गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा भाजपच्या जागा वाढलेल्या दिसत आहेत. २०१५ साली भाजपला दिल्लीत केवळ ३ जागांवर यश मिळालं होतं.