पाच दिवसांचा आठवडा स्वागतहार्यच
जागतिक पातळीवरील नावारुपाला आलेल्या गुगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थांची कार्यप्रणाली आत्मसात करत कुशल मनुष्यबळाला अधिक कुशल आणि कार्यप्रणाली अस्तित्वा आलेली आहे. याच धोरणाला आत्मसात करण्यासाच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने पाच दिवसांचा आठवडा अस्तित्वा आणण्याचा घेतला आणि तो स्वागतहार्यच आहे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र सरकारच्या कामांना सुरुवात झालेली आपणास दिसत असतानाच केंद्र सरकारप्रमाणे राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. सध्या दुसरा व चौथा शनिवार कार्यालयीन सुट्टी असते. राज्य शासकीय कर्मचार्‍यांनाही पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. गेल्या महिन्यांपासून या निर्णयाला मंजुरी देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून वेगवान हालचाली करण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बुधवारी मंत्रिमंडळात या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी राहील. यासोबतच दररोज 45 मिनिटांचे वाढीव काम अधिकारी आणि कर्मचार्‍यांना करावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारीपासून होईल, असे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले.निर्णय यांना लागू नाही - ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसांचा आठवडा लागू नाही.ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसांचा आठवडा लागू नाही. निर्णय यांना लागू नाही - अत्यावश्यक सेवा : शासकीय रुग्णालये, चिकित्सालये, पोलीस, कारागृहे, पाणीपुरवठा प्रकल्प, अग्निमशन दल, सफाई कामगार. निर्णय यांना लागू नाही - अत्यावश्यक सेवा : शासकीय रुग्णालये, चिकित्सालये, पोलीस, कारागृहे, पाणीपुरवठा प्रकल्प, अग्निमशन दल, सफाई कामगार. निर्णय यांना लागू नाही. शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, तंत्रनिकेतने आदी संस्थांमध्ये हे निर्णय यांना लागू होणार नाहीत. त्याशिवाय जलसंपदा विभाग : दापोडी, सातारा, वर्धा, अकोला, अहमदनगर, अष्टी, खडकवासला, नाशिक व नांदेड येथील कर्मशाळा. नागपूर, भंडारा येथील मध्यवर्ती कर्मशाळा तसेच जलसंपदा व सार्वजनिक विभागांतर्गत क्षेत्रीय कामावरील व प्रकल्पांवरील नियमित आस्थापना, स्थायी व अस्थायी आस्थापना व रोजंदारीवरील क्षेत्रिय कामगार व कर्मचारी. याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत येणारं नागपूर येथील व्हॅक्सिन इन्स्टिटयूटचा समावेश आहे. महसूल व वन विभाग : बल्लारशा, परतवाडा व डहाणू येथील एकात्मिकृत घटके, अलापल्ली येथील सॉ मिल, विभागीय वन अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील परतवाडा व बल्लारशा येथील वर्कशॉप, पुणे येथील शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालये. निर्णय यांना लागू नाही - महसूल व वन विभाग : बल्लारशा, परतवाडा व डहाणू येथील एकात्मिकृत घटके, अलापल्ली येथील सॉ मिल, विभागीय वन अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील परतवाडा व बल्लारशा येथील वर्कशॉप, पुणे येथील शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालये. सामान्य प्रशासन विभागातील शासकीय परिवहन सेवेचा कारखाना विभाग, कृषी विभागातील दुग्धशाळा विकास विभागांतर्गत दुग्ध योजना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील शासकीय मुद्रणालये आणि कौशल्य व उद्योजकता विकासातंर्गत येणारी सर्व आयटीआय. सरकारची भूमिका - केंद्र शासनाप्रमाणे राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. सध्या दुसरा व चौथा शनिवार कार्यालयीन सुट्टी असते. पाच दिवसांच्या आठवडयाच्या प्रस्तावामुळे शासकीय कार्यालयातील वीज, पाणी, वाहनांचे डिझेल, पेट्रोल या खर्चामध्ये बचत होणार आहे. तसेच शासकीय कर्मचार्‍यांना कुटुंबांना वेळ देणे शक्य होऊन त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावेल, असे शासनाचे म्हणणे आहे. सध्याच्या कार्यालयीन वेळेमुळे वर्षांतील सरासरी कार्यालयीन दिवस 288 होतात. भोजनाचा 30 मिनिटांचा कालावधी वगळून प्रतिदिन 7 तास 15 मिनिटे कामाचे तास होतात. यामुळे एका महिन्यातील कामाचे तास 174 तर एका वर्षांतील कामाचे तास 2088 इतके होतात. पाच दिवसाच्या आठवडयामुळे वर्षांतील सरासरी कार्यालयीन दिवस 264 होतील. मात्र, कामाचे 8 तास होतील. म्हणजेच प्रतिदिन 45 मिनिटे अधिक काम करावे लागेल. सध्या बृहन्मुंबईतील कार्यालयांची कामकाजाची वेळ सकाळी 9.45 ते सायं. 5.30 अशी आहे. ती आता 9.45 ते सायं. 6.15 अशी होईल. शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी 9.30 ते सायं.6.30 अशी राहील. बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयांसाठी ही वेळ 9.45 ते सायं.6.15 अशी राहील. बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयांसाठी सकाळी 10.00 ते सायं. 5.45 अशी कामाची वेळ सध्या आहे. मात्र आता पाच दिवसाचा आठवडा केल्यामुळे मुंबई आणि मुंबईबाहेरील सर्व कार्यालयांसाठी एकच वेळ निष्टिद्धी(155)त करण्यात आली आहे. सध्याच्या या कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी 1 ते 2 या वेळेमधील जास्तीत जास्त अध्र्या तासाची भोजनाची वेळही अंतर्भूत आहे.