*म्हातारपण आलं होतं.मेघा नेहमी आजारी राहात होती.आजही तिची प्रकृती खराब होती.तिला नीट बसता येत नव्हतं.नीट उठताही येत नव्हतं.तिला फार अशक्त जाणवत होतं.म्हातारपण छळत होतं.अंगाची लाही लाही होत होती.कारण मुलगा आणि सुन तिच्याजवळ नव्हते.त्याचबरोबर तिच्या मनात विचार येत होता की आपण असं कोणतं कर्म केलं की कर्माची शिक्षा आपल्याला भोगावी लागत आहे.*
मेघा लहान होती.बालपण चांगलं गेलं होतं.लहानपणी शाळेत मायबापानं जेव्हा नाव टाकायला नेलं,तेव्हा ती सात वर्षाची होवूनही कानाला हात न पुरत असल्यानं तिला शाळेत घेतलं नाही व तिला शाळेत घेतलं नसल्यानं दोन वर्ष वाया गेली.त्यातच तिची शिकायची इच्छा जरी असली तरी बालपणातच मायबापांनी तिचं लग्न एका मुलाशी लावून दिलं.सासरीही तिला पाहिजे तेवढं सुख मिळालं नाही.त्यातच एक दिवस तिचा पती चालता झाला आणि वैधव्य आलं.मुलगा पोटात असतांनाच तिचा पती मरण पावला.मग काय सारेच नातेवाईक तिला दुषणे देवू लागले.कोणी करंटी,भोंड्या कपाळाची म्हणू लागले.पण ती जगली.आपल्या एका पोराची आस धरुन.
तिचं पतीवर निरतिशय प्रेम. ती जगली आपल्या मनात आपल्या पोटातील बाळाची आस घेवून.तेच बाळ आपल्या पतीचं नाव चालवणार.आपला आधार बनणार.आपल्याला म्हातारपणात पोसणार.सारेच स्वप्न ती पाहात होती.
तिनं बाळाला जन्म दिला.त्याला कष्ट करता करता दूध पाजलं.देह झिजवत झिजवत शिकवलं.लहानाचं मोठं केलं.नव्हे तर आपला तरुणपणा गोठवून तिनं बाळाला जपलं.दुसरी असती तर तिनं पुनर्विवाह केला असता.आपले सुख पाहिले असते आणि त्यातच दुस-या पतीच्या नादात आपल्या मुलाला होणारा त्रास ओढवून घेतला असता.
आपल्या मुलाच्या सुखासाठी ती राब राब राबली.आपल्याला म्हातारपणात सुख प्राप्त होईल या आशेनं.त्यातच तिचा बाळ शिकला.तिनं त्याला शिकवलं.नातेवाईक व समाजाच्या खस्ता खात खात इंजिनियरही बनवलं.
तरुणपण ते......तिला पुनर्विवाह करण्याची इच्छा व्हायची.पण मनात विचार यायचा.आपण विवाह तर करु.पण त्यानंतर आपल्या बाळाचं कसं होणार!शेवटी तिनं विवाह करणं टाळलं.पण वासना ती.त्या वासनेला कोण रोखणार! शेवटी तिची इच्छा नसतांनाही केवळ आपल्या शरीराची शारिरीक इच्छा भागवण्यासाठी ती कष्टाच्या कामासोबत अशी शारिरीक कामंही लपूनचोरुन करु लागली.अर्थात देहविक्रय करु लागली.पण नियती ती जे काही कर्म करीत होती.ते सगळं लपून पाहात नव्हती तर उघड्या डोळ्यांनी पाहात होती.तिची काहीही चूक नसतांना नियतीनं तिच्याकडून तिचा पती हिरावून घेतला होता.पण ह्याच क्रूर नियतीनं तिला पुढील जीवनातही माफ केलं नाही.
तिच्या बाळाचं नाव रमेश होतं.रमेश खुप शिकला.इंजीनियर झाला.त्यानंतर त्याचं लग्न केलं.मुलगीही फार शिकलेलीच मागीतली होती.लग्न फार थाटामाटात पार पडलं होतं.
काही दिवस संसार सुखाचा चालला.पण काही दिवसानं सासू सुनेचं पटेनासं झालं.सुन सासूशी झगडू लागली.भांडण विकोपाला जावू लागलं.मग काय पती रमेशला सोडून त्याची पत्नी माहेरी जावून राहू लागली.त्याला तडपवू लागली.नोटीस पोलिसस्टेशनच्या धमक्या देवू लागली.
रमेशला या जीवनाचा वैताग यायला लागला.त्यातच एक दिवस त्यानं याच त्रासाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पण मेघाच्या आरडाओरडण्यानं तो थोडक्यात वाचला.शेवटी मेघा म्हणाली की त्याने तसे स्वतः आत्महत्या करुन मरण्यापेक्षा पत्नीच्या माहेरी जावून राहावं.
आईनं सांगीतलेली गोष्ट रमेशला पटली होती.ह्या अशा त्रासापेक्षा व धमकीपेक्षा आपण पत्नीच्या माहेरी जावून राहिलं तर......त्याला फार विचार येत होता.पण आईला सोडून त्याला जावेसे वाटत नव्हते. परंतू काय करणार तो.त्याला पत्नीचीही फार आठवण यायची.त्यातच मुलाबाळांचीही.शेवटी आईची इच्छा.तो पत्नीच्या माहेरी राहायला गेला.
रमेश पत्नीच्या माहेरी तर राहायला गेला.त्याला आईची फार आठवण यायची.कधीतरी आईची सेवा करावीशी वाटायची.पण काय करणार.लपून चोरुन तो आईची भेट घ्यायला येवू लागला आणि आईची भेट घेवू लागला.
आता तर तो आईला पाहायला येईनासा झाला.तो मुलाबाळातच खुश झाला होता.आई मेघा आज म्हातारी झाली होती.तिला उठता बसता येत नव्हते.तिच्या फार गती चालल्या होत्या.तिला सारखी रमेशची आठवण येत होती.म्हातारपण कटत नव्हतं.ते म्हातारपण जड जात होतं.जगणं मुश्किल होत होतं.
ती पलंगावरच होती.कधीकधी विचार करायची की आपण कोणतं पाप केलं असावं? शेवटी तिला आठवायचं की आपण या बाळासाठी जरी आपला संसार बसवला नसला तरी एक पाप नक्कीच आपल्या हातून झालंय.ते म्हणजे आपण आपल्या वासनेची इच्छा पुर्ण करण्यासाठी आपल्या देहाचा सौदा केलाय.ज्या सौद्यानं इतरांचे संसार बिघडले.तेच पाप आज निघत आहे.
ती खुप तळपायची.तिला फार वेदना व्हायच्या.मोठंसं घर असलं तरी ते घर तिला खायला धावायचं.पण काय करणार होती ती.ती विचार जरी करीत असली तरी म्हातारपण असंही तिला छळत होतं की ज्या म्हातारपणात तिला तिचं तरुणपण असंही छळत होतं.नियती क्रुर झाली होती.
कोरोना आला होता.सगळीकडं लॉकडाऊन होतं.अशातच तिचा आजार वाढतच चालला होता.शेवटी ती एक दिवस त्या आजारात मरण पावली.पण तिच्या त्या तिरडीला खांदा द्यायला तो मुलगा येवू शकला नाही.कारण क्रुर नियतीनंच तिच्या तरुणपणाच्या पापाचा निकाल लावला होता तसेच निर्णयही दिला होता.
मेघा लहान होती.बालपण चांगलं गेलं होतं.लहानपणी शाळेत मायबापानं जेव्हा नाव टाकायला नेलं,तेव्हा ती सात वर्षाची होवूनही कानाला हात न पुरत असल्यानं तिला शाळेत घेतलं नाही व तिला शाळेत घेतलं नसल्यानं दोन वर्ष वाया गेली.त्यातच तिची शिकायची इच्छा जरी असली तरी बालपणातच मायबापांनी तिचं लग्न एका मुलाशी लावून दिलं.सासरीही तिला पाहिजे तेवढं सुख मिळालं नाही.त्यातच एक दिवस तिचा पती चालता झाला आणि वैधव्य आलं.मुलगा पोटात असतांनाच तिचा पती मरण पावला.मग काय सारेच नातेवाईक तिला दुषणे देवू लागले.कोणी करंटी,भोंड्या कपाळाची म्हणू लागले.पण ती जगली.आपल्या एका पोराची आस धरुन.
तिचं पतीवर निरतिशय प्रेम. ती जगली आपल्या मनात आपल्या पोटातील बाळाची आस घेवून.तेच बाळ आपल्या पतीचं नाव चालवणार.आपला आधार बनणार.आपल्याला म्हातारपणात पोसणार.सारेच स्वप्न ती पाहात होती.
तिनं बाळाला जन्म दिला.त्याला कष्ट करता करता दूध पाजलं.देह झिजवत झिजवत शिकवलं.लहानाचं मोठं केलं.नव्हे तर आपला तरुणपणा गोठवून तिनं बाळाला जपलं.दुसरी असती तर तिनं पुनर्विवाह केला असता.आपले सुख पाहिले असते आणि त्यातच दुस-या पतीच्या नादात आपल्या मुलाला होणारा त्रास ओढवून घेतला असता.
आपल्या मुलाच्या सुखासाठी ती राब राब राबली.आपल्याला म्हातारपणात सुख प्राप्त होईल या आशेनं.त्यातच तिचा बाळ शिकला.तिनं त्याला शिकवलं.नातेवाईक व समाजाच्या खस्ता खात खात इंजिनियरही बनवलं.
तरुणपण ते......तिला पुनर्विवाह करण्याची इच्छा व्हायची.पण मनात विचार यायचा.आपण विवाह तर करु.पण त्यानंतर आपल्या बाळाचं कसं होणार!शेवटी तिनं विवाह करणं टाळलं.पण वासना ती.त्या वासनेला कोण रोखणार! शेवटी तिची इच्छा नसतांनाही केवळ आपल्या शरीराची शारिरीक इच्छा भागवण्यासाठी ती कष्टाच्या कामासोबत अशी शारिरीक कामंही लपूनचोरुन करु लागली.अर्थात देहविक्रय करु लागली.पण नियती ती जे काही कर्म करीत होती.ते सगळं लपून पाहात नव्हती तर उघड्या डोळ्यांनी पाहात होती.तिची काहीही चूक नसतांना नियतीनं तिच्याकडून तिचा पती हिरावून घेतला होता.पण ह्याच क्रूर नियतीनं तिला पुढील जीवनातही माफ केलं नाही.
तिच्या बाळाचं नाव रमेश होतं.रमेश खुप शिकला.इंजीनियर झाला.त्यानंतर त्याचं लग्न केलं.मुलगीही फार शिकलेलीच मागीतली होती.लग्न फार थाटामाटात पार पडलं होतं.
काही दिवस संसार सुखाचा चालला.पण काही दिवसानं सासू सुनेचं पटेनासं झालं.सुन सासूशी झगडू लागली.भांडण विकोपाला जावू लागलं.मग काय पती रमेशला सोडून त्याची पत्नी माहेरी जावून राहू लागली.त्याला तडपवू लागली.नोटीस पोलिसस्टेशनच्या धमक्या देवू लागली.
रमेशला या जीवनाचा वैताग यायला लागला.त्यातच एक दिवस त्यानं याच त्रासाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पण मेघाच्या आरडाओरडण्यानं तो थोडक्यात वाचला.शेवटी मेघा म्हणाली की त्याने तसे स्वतः आत्महत्या करुन मरण्यापेक्षा पत्नीच्या माहेरी जावून राहावं.
आईनं सांगीतलेली गोष्ट रमेशला पटली होती.ह्या अशा त्रासापेक्षा व धमकीपेक्षा आपण पत्नीच्या माहेरी जावून राहिलं तर......त्याला फार विचार येत होता.पण आईला सोडून त्याला जावेसे वाटत नव्हते. परंतू काय करणार तो.त्याला पत्नीचीही फार आठवण यायची.त्यातच मुलाबाळांचीही.शेवटी आईची इच्छा.तो पत्नीच्या माहेरी राहायला गेला.
रमेश पत्नीच्या माहेरी तर राहायला गेला.त्याला आईची फार आठवण यायची.कधीतरी आईची सेवा करावीशी वाटायची.पण काय करणार.लपून चोरुन तो आईची भेट घ्यायला येवू लागला आणि आईची भेट घेवू लागला.
आता तर तो आईला पाहायला येईनासा झाला.तो मुलाबाळातच खुश झाला होता.आई मेघा आज म्हातारी झाली होती.तिला उठता बसता येत नव्हते.तिच्या फार गती चालल्या होत्या.तिला सारखी रमेशची आठवण येत होती.म्हातारपण कटत नव्हतं.ते म्हातारपण जड जात होतं.जगणं मुश्किल होत होतं.
ती पलंगावरच होती.कधीकधी विचार करायची की आपण कोणतं पाप केलं असावं? शेवटी तिला आठवायचं की आपण या बाळासाठी जरी आपला संसार बसवला नसला तरी एक पाप नक्कीच आपल्या हातून झालंय.ते म्हणजे आपण आपल्या वासनेची इच्छा पुर्ण करण्यासाठी आपल्या देहाचा सौदा केलाय.ज्या सौद्यानं इतरांचे संसार बिघडले.तेच पाप आज निघत आहे.
ती खुप तळपायची.तिला फार वेदना व्हायच्या.मोठंसं घर असलं तरी ते घर तिला खायला धावायचं.पण काय करणार होती ती.ती विचार जरी करीत असली तरी म्हातारपण असंही तिला छळत होतं की ज्या म्हातारपणात तिला तिचं तरुणपण असंही छळत होतं.नियती क्रुर झाली होती.
कोरोना आला होता.सगळीकडं लॉकडाऊन होतं.अशातच तिचा आजार वाढतच चालला होता.शेवटी ती एक दिवस त्या आजारात मरण पावली.पण तिच्या त्या तिरडीला खांदा द्यायला तो मुलगा येवू शकला नाही.कारण क्रुर नियतीनंच तिच्या तरुणपणाच्या पापाचा निकाल लावला होता तसेच निर्णयही दिला होता.
अंकुश शिंगाडे नागपूर